शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास प्रेरणादायी-- इस्माईल पठाण :- व्याख्यानातून मांडला जाज्वल्य इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 14:12 IST

छत्रपती संभाजी महाराज पराक्रमात आणि राज्यकारभारात आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तसूभरही कमी नव्हते. त्यांचा थेट स्वभाव काहीजणांच्या दृष्टीने अडचणीत आणणारा असल्याने त्यांच्याबद्दल बखरीतून जाणीवपूर्वक बदनामीकारक लिखाण झाले. आता मात्र त्यांच्या चारित्र्यावरील हा डाग पुसला जात आहे

ठळक मुद्देपठाण म्हणाले, संभाजी महाराजांचा स्वभाव रोकठोक होता. असा छत्रपती अष्टप्रधान मंडळातील काही प्रधानांना नको होता, तर सोयराबार्इंना राजाराम महाराजांना छत्रपती बनवायचे होते. या राजकारणातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी केली गेली, तर नाटककार व कादंबरीकारां

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज पराक्रमात आणि राज्यकारभारात आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तसूभरही कमी नव्हते. त्यांचा थेट स्वभाव काहीजणांच्या दृष्टीने अडचणीत आणणारा असल्याने त्यांच्याबद्दल बखरीतून जाणीवपूर्वक बदनामीकारक लिखाण झाले. आता मात्र त्यांच्या चारित्र्यावरील हा डाग पुसला जात आहे. विशेषत: तरुणांना त्यांचा जाज्वल्य इतिहास अधिक आकर्षित करत आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. इस्माईल पठाण यांनी सोमवारी केले.

शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीनिमित्त भवानी मंडपातील शेतकरी संघाच्या हॉलमध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी नोकर युनियनच्या वतीने आयोजित व्याख्यानात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाशझोत टाकला. अध्यक्षस्थानी संघाचे ज्येष्ठ संचालक व्यंकाप्पा भोसले होते.

पठाण म्हणाले, संभाजी महाराजांचा स्वभाव रोकठोक होता. असा छत्रपती अष्टप्रधान मंडळातील काही प्रधानांना नको होता, तर सोयराबार्इंना राजाराम महाराजांना छत्रपती बनवायचे होते. या राजकारणातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी केली गेली, तर नाटककार व कादंबरीकारांनी त्यात भर टाकली; त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मराठा इतिहासकारांनी सर्व कागदपत्रांचे संशोधन करून खरा इतिहास पुढे आणला. त्यात वा. सी. बेंद्रे, प्रा. डॉ. कमल गोखले व प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचे मोलाचे योगदान आहे.

ते म्हणाले, संभाजी महाराजांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला. त्यांना ठार मारण्याचे कट रचले गेले. दुसरीकडे ते सलग नऊ वर्षे कुतुबशाही, आदिलशाही, मुघल, फ्रेंच, इंग्रज अशा सहा शत्रूंशी एकाकी लढत होते. त्यात औरंगजेबाचा समावेश होता. औरंगजेबाच्या सत्तेला शिवाजी महाराजांनी शह दिला होता, त्याचा राग त्याच्या मनात होता. अखेर स्वकियांनीच केलेल्या घातामुळे संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले. महिनाभर हाल हाल करून महाराजांना मारले. तरीही संभाजी महाराजांनी औरंगजेबाला मुजरा केला नाही. स्वाभिमान जपला व हौतात्म्य पत्करले. त्यांचा हा इतिहास समजून घेण्याची गरज आहे.

व्यंकाप्पा भोसले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. दिलीप पवार यांनी व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. दीपक निंबाळकर यांनी आभार मानले. यावेळी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील भुयेकर, संभाजी जगदाळे, बी. एल. बरगे, सुभाष वाणी, अरुण पाटील, बाबूराव लाटकर, उमेश पानसरे, आदी उपस्थित होते.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर